शांत रस - सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार , हास्य , करूण , रौद्र , वीर , भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती अखेर शांत रसातच होते. त्यामुळेच आचार्य अभिनवगुप्तही शांत रसाला सर्वश्रेष्ठ मानतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसुत्रीतील अंतिम चरण म्हणजे मोक्ष साधन. त्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षप्राप्ती, तेच शांत रसाचे लक्ष्य आहे. त्यामुळे शांत रसाचे महत्त्व अधिक वाढते. न यत्र दुःखं न सुखं न चिन्ता न द्वेषरोगौ न च काचिदिच्छा| रसः स शान्तः कथितो मुनीन्द्रैः सर्वेषु भावेषु समप्रमाणः|| ज्या ठिकाणी सर्व भाव-भावनांचे समत्व साध्य झाले आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी सुख, दुःख, चिं...